Ad will apear here
Next
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी
मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील नागरिकांतर्फे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

बापट म्हणाले, ‘पुण्यात आधीच मेट्रोचे दोन ट्रॅक असून, त्यांच्या कामांना वेग आला आहे. हिंजवडी हा औद्योगिक परिसर आहे आणि इथे सुमारे दीड-दोन लाख लोक खासगी वाहनाने येत असतात. इथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो असावी, अशी मागणी होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. पुण्यातील वाहतूक नियोजनासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक गतिमान होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे.’

‘पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. याची बहुतेक कामे पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत. पन्नास एकराचा भूखंड शेतकऱ्यांशी चर्चा करून डेपो म्हणून घेण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनातर्फे मिळालेला भूखंड ‘पीएमआरडीए’ विकसित करणार आहे,’ अशी माहिती बापट यांनी या वेळी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZZLBR
Similar Posts
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे
नवाब मलिक यांचे बापट यांच्यावरील आरोप मागे पुणे : तूरडाळ प्रकरणात गिरीश बापट यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतला आहे.
‘सर्व माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे’ पुणे : ‘समाजमाध्यमांमुळे वाचनसंस्कृतीचे स्वरूपही बदलत आहे. हा बदल सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारा असला पाहिजे. त्यासाठी सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language