समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही.
मग यातून मार्ग कसा काढायचा, जे ठरवू ते पूर्ण कसे करायचे, निर्णयावर ठाम कसे राहायचे या विषयी आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो. प्रस्तुत पुस्तकात सरश्रींनी अत्यंत सोप्या प्रवाही भाषेत आणि एकसूत्ररुपामध्ये आपल्या मनातला गोंधळ बाजूला ठेवून जीवनात यशस्वी होण्याची सूत्रे सांगितली आहेत.