रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश नारायणराव राणे हे एक एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, देवगडचे आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या नंतर रत्नागिरीमध्ये स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा होईल.
२३ एप्रिलला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. एक एप्रिलला ते रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाळा कसालकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता सतीश सावंत, रत्नागिरी जिल्हा प्रवक्ता नित्यानंद दळवी, जिल्हा प्रभारी राजन देसाई, सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, विकास कुडाळकर, भालचंद्र कोळंबकर, एकनाथ नाडकर्णी, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संध्या तेरसे, रत्नागिरीच्या महिला जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, सिंधुदुर्गचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, रत्नागिरीचे युवक जिल्हाध्यक्ष वैभव विरकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अविनाश पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, विकास पाटील, लांजा तालुकाध्यक्ष संजय यादव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष बापू सुर्वे, रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, राजापूरचे तालुकाध्यक्ष हनिफ मुसा काझी, परिमल भोसले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.