Ad will apear here
Next
रत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’
सुरेश प्रभूरत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नवीन व सुरू असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आणि हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीत एक मे २०१८ रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे.

देशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाइस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, जेमस अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीज, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

कोकणाच्या विकासाला चालना द्यायची असेल, तर कोकणातील तरुण नोकरीसाठी कोकण सोडून शहरांमध्ये जाणार नाही, यासाठी इथल्या तरुणांना इथेच कृषी, मत्स्य व पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यासाठी भारतातील केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या अनेक प्रमुख विभागाचे निर्णयक्षम उच्चाधिकारी यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे उपक्रम निर्माण करता येतील यांची नियोजनबद्ध आखणी करण्यासाठी प्रभू यांनी या उच्चस्तरीय ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’चे नियोजन केले आहे

प्रभूंच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्रथम उत्तम आखणी त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पांसंदर्भातील नियोजन व सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ठोस कार्यक्रमाचे नियोजन या पद्धतीने रत्नागिरीतील उच्चस्तरीय ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ सत्राच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला पुन्हा एकदा वेग मिळणार आहे. कोकणातील कृषी उत्पादनांना निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेज तसेच निर्यात केंद्र सुरू करण्याचा प्रभू यांचा मानस आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला तसेच रत्नागिरी शहरातील विमानतळाला प्रभू भेट देणार आहेत. दोन्ही विमानतळ लवकरच सुरू होण्याच्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZIYBM
Similar Posts
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
नीलेश राणे एक एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश नारायणराव राणे हे एक एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, देवगडचे आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.
रत्नागिरीत ३० जानेवारीला पर्यटन परिषद रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याची हेतूने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी चार या वेळेत पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language