आपल्या अरण्यातल्या भ्रमंतीतून स्वतःचं आयुष्य समृद्ध करणारे, निसर्गाच्या समृद्धीबद्दलचं विपुल लेखन करून मराठी भाषेला लाखभर नव्या शब्दांची समृद्धी देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा पाच नोव्हेंबर हा जन्मदिन. आज त्यांना ८८ वर्षे झाली. गेल्याच महिन्यात म्हणजे ११ ऑक्टोबर २०२० रोजी मारुती चितमपल्ली यांनी विदर्भाचा कायमचा निरोप घेऊन सोलापूर या आपल्या जन्मगावी प्रस्थान केले. आयुष्यातील ४५ वर्षे त्यांनी विदर्भातल्या जंगलांत व्यतीत केली. कर्मभूमीतून पुन्हा जन्मभूमीकडे जाताना त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत, याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.
(व्हिडिओ सौजन्य : आशुतोष शेवाळकर यांची फेसबुक वॉल)
(मारुती चितमपल्ली यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)