Ad will apear here
Next
रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू
संस्कृत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना डॉ. आठल्ये. शेजारी रेखा इनामदार, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, नरेंद्र गावंड, गोपाळ चौधरी.

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण १६ जुलैला सुरू झाले आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण आहे. नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत भारती आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण होत आहे. 

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये शिबिराचे उद्घाटन झाले. त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, संस्कृत शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखा इनामदार, महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात प्रणव गोगटे व आशिष आठवले हे प्रशिक्षक आहेत.

उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड म्हणाले, ‘सर्वच भाषांवर अन्य भाषांचे आक्रमण झाले. तरीही संस्कृत ही शुद्ध भाषा आहे. सुंदर व गोडवा असलेली भाषा म्हणून ती जगभर प्रसिद्ध आहे. संस्कृत अभ्यासक्रम बदलला असून, बोलण्याच्या कौशल्याने भाषा शिकण्यासारखा तो अभ्यासक्रम आहे. त्याचे महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मीसुद्धा एका सत्रात ‘ओम्’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. संस्कृत विश्व विद्यालयातून एक पदवी घेण्याचा माझा मानस आहे.’

डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘महाविद्यालयाचा संस्कृत विभाग दर्जेदार कार्य करत आहे. कालिदास व्याख्यानमाला, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी आदान-प्रदान , संस्कृत संस्थान, विद्यापीठ, संस्कृत प्रचारासाठी काम करत आहे. प्रा. हातवळणे, प्रा. नेने, प्रा. घाटे, तसेच डॉ. आठल्ये यांनी संस्कृतसाठी मोठे योगदान दिले आहे.’

डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘संस्कृतचा बदललेला अभ्यासक्रम ही क्रांती आहे. तो प्रत्यक्षात आणणे ही उत्क्रांती आहे. कालिदास विश्वसविद्यालयातर्फे महाराष्ट्रात सर्वत्र प्रशिक्षण शिबिर होणार असून, पहिले प्रशिक्षण येथे होत आहे. याकरिता जिल्हा परिषदेचे फार मोठे सहकार्य लाभले. पाच दिवसांत संस्कृत शिक्षणाची शिदोरी शिक्षकांना मिळणार आहे.’ 

आधी संभाषण, नंतर व्याकरण अशा स्वरूपात शिक्षकांनी शिकवावे, असेही त्या म्हणाल्या.


हेही जरूर वाचा : 









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMYCC
Similar Posts
‘पाच वर्षांत संस्कृतला आले अच्छे दिन’ रत्नागिरी : ‘देशात गेल्या पाच वर्षांत संस्कृतसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘आयआयटी’मध्ये वैकल्पिक विषय म्हणून संस्कृत शिकवतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही संस्कृत शिकवले जाते. तमिळनाडूमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंत संस्कृत शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील संस्कृत शिक्षकांनीही लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय रत्नागिरी : ‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू
आधुनिक वैज्ञानिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची संस्कृतमध्ये क्षमता रत्नागिरी : ‘संस्कृत ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. विज्ञानातील अत्याधुनिक पारिभाषिक, तांत्रिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे. कारण या भाषेत २२ उपसर्ग, दोन हजार धातू (मूळ क्रियापदे) आणि दोनशे प्रत्यय आहेत. त्यांच्या योग्य वापराने इंग्रजी भाषेतील वैज्ञानिक संज्ञांनाही अर्थपूर्ण
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगला संस्कृत दिनाचा कार्यक्रम रत्नागिरी : संस्कृतला गीर्वाणवाणी म्हणजे देवांची भाषा असे म्हटले जाते; पण साध्या-सोप्या नियमांचा अभ्यास केला, तर ती कोणीही बोलू शकते. ती रोजच्या संवादाचीही भाषा होऊ शकते, हे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संस्कृत दिनी दाखवून दिले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language