कोल्हापूर : राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत कोल्हापूरमधील शाहूवाडी येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ जुलै रोजी सागाच्या १०२ रोपांची लागवड करण्यात आली.
डॉ. शरदचंद्र साळुंखे यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ‘देश सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी सर्वांनी झाडे लावा व झाडे जगवा’ असा संदेश त्यांनी या वेळी दिला.
कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. सी. महाजन, प्रा. एच. पी. पाटील, प्रा. वर्षा पवार, प्रा. संदीप पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वारुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक, तहसीलदार रवी पाटील आणि श्री. ससाणे यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.