Ad will apear here
Next
विवेकानंद महाविद्यालयाचा वृक्षलागवड कार्यक्रम
कोल्हापूर : राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत कोल्हापूरमधील शाहूवाडी येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ जुलै रोजी सागाच्या १०२ रोपांची लागवड करण्यात आली.

डॉ. शरदचंद्र साळुंखे यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ‘देश सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी सर्वांनी झाडे लावा व झाडे जगवा’ असा संदेश त्यांनी या वेळी दिला. 

कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. सी. महाजन, प्रा. एच. पी. पाटील, प्रा. वर्षा पवार, प्रा. संदीप पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी केले.  

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वारुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक, तहसीलदार रवी पाटील आणि श्री. ससाणे यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSQBE
Similar Posts
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनदेखील करावे ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ
विवेकानंद महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा कोल्हापूर :  ‘ब्रिटीशांच्या गुलामीतून मुक्त होऊन भारतीय स्वातंत्र्याला आज ७० वर्षे झाली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सर्व युवकांनी राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन समाजकार्यात उतरले पाहिजे व या देशाला प्रगतीपथाकडे नेले पाहिजे.’ असे विचार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language