Ad will apear here
Next
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प
कुलभूषण बिरनाळे यांच्यासह लक्ष्मीकांत देशमुख, शिरीष बेरी आदींचा सहभाग

पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.

कुलभूषण बिरनाळे
या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना, आराखडा, नियोजित कार्यपद्धती आणि पुढील कार्यवाही यावरील चर्चेसाठी शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमधील ज्ञानेश्वर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ‘या बैठकीला सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करावे,’ असे आवाहन कुलभूषण बिरनाळे यांनी केले आहे.

पूरग्रस्तांच्या घरांच्या पुनर्बांधणीचे मोठे आव्हान लोकांसमोर आणि प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. या कामात आपलाही सहभाग असावा म्हणून बिरनाळे यांनी समाजमाध्यमाद्वारे ही संकल्पना मांडली. सर्व स्तरातून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासमवेत पूर्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेले लक्ष्मीकांत देशमुख, प्रसिद्ध वास्तुरचनाकार शिरीष बेरी, टाटा ग्रुपचे माजी व्यवस्थापक दीपक गोखले यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती, तसेच आयएएस अधिकारी संघटना, इन्फोसिस, स्ट्रॅटेजिक फोरसाइट, महाराष्ट्र चेंबर आदी अनेक संस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे.

कुलभूषण बिरनाळे गेल्या दहा वर्षांपासून अब्दुललाट येथे अनाथ, वंचित मुलांसाठी बालोद्यान ही संस्था चालवत आहेत. ‘बालोद्यान संस्थेच्या पुढाकारातून नव्या घरांच्या उभारणीचा प्रकल्प राबविला जाणार असून, प्रकल्पाचा आराखडा प्रसिद्ध वास्तुरचनाकार शिरीष बेरी आणि दीपक गोखले तयार करत आहेत. लक्ष्मीकांत देशमुख यांचा या भागातील प्रशासकीय अनुभव या प्रकल्पात महत्त्वाचा ठरणार आहे,’ असेही बिरनाळे म्हणाले. 

(‘बालोद्यान’च्या कार्याची ओळख करून देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZRMCD
Similar Posts
‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला पुणे : पुराच्या तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील गावांमध्ये अनेक ठिकाणांहून मदत पोहोचत आहे; पण आभाळच कोसळल्यावर ठिगळ तरी कुठे, कुठे लावणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मदतीच्या हातांमध्ये आपलाही एक हात असावा या उद्देशाने आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.
युनिक स्कूलतर्फे पूरग्रस्तांना मदत पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ईगल एज्युकेशन सोसायटीच्या युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली. धान्य, कपडे, टिकाऊ कोरडे खाद्यपदार्थ, चादर, शाल, रग, स्वेटर आदींचा यात समावेश होता.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एनएसएस’चे विद्यार्थी रवाना पुणे : पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामात मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी पुढे सरसावले असून, गुरुवारी (२२ ऑगस्ट) ५०० विद्यार्थ्यांचे पथक या भागात रवाना झाले. या पथकाच्या गाड्यांना विभागीय आयुक्त डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language