Ad will apear here
Next
मराठी देवगीता
महाभारतात श्रीकृष्णाने शिष्य अर्जुनाला काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्या प्रश्नांचे निरसन केले ते भगवद्गीतेतून आपल्या समोर आले आहे, अशी व्याख्या डॉ. प्रा. पा. हं. कुलकर्णी यांनी मराठी ‘देवगीता’मध्ये केली आहे.    

या पुस्तकात त्यांनी भगवद्गीतेचा भावार्थ सोप्या शब्दांत, गद्यरूपात सांगितला आहे. रणभूमीवर अर्जुनाला कृष्णाने सातशे श्लोकांमध्ये म्हणजे चौदाशे ओळींत उपदेश केला. त्या श्लोकांचे मराठीत रुपांतर यात केले आहे. जगावे कसे याचे मार्गदर्शन करणारी गीता सर्वांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यात मूळ अध्यायांना मराठी नावे दिली आहेत. कृष्णाने केलेला उपदेश ऐकून अर्जुनाला जे समजेल, कळाले ते यात लिहिले आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीच्या त्या प्रकरणातील महत्त्वाचा भाग, उपदेश थोडक्या शब्दांत लिहिला आहे.  

पुस्तक : मराठी देवगीता
लेखक : पांडुरंग कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल
पाने : ९२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSMBV
Similar Posts
होण्या बरे- गोळ्या चूर्णे निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकविणे आपल्या हातात असते. यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे; पण तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते. कधी गंभीर आजार जडावतात. त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच. यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म, ती बनविण्याची पद्धत, औषधे वापरण्याचे प्रमाण याची माहिती प्रा
देवमाळ देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.
प्रश्नोत्तर रत्न मालिका (सचित्र) अद्वैताचा सिद्धांत मांडणाऱ्या आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे व काव्ये रचली आहेत. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात प्रश्नोत्तर रत्नमालिकेची पद्य स्वरूपात रचना केली. प्रश्न आणि त्याची उत्तरे असे यातील श्लोक आहेत. याचे मराठी रूपांतर पां
विवेक चूडामणी म्हणजे शहाणे रत्न सनातन वैदिक धर्माचा प्रचार करणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अनेक मोठे ग्रंथ लिहिले. भारतभर प्रचार करून अनेकांना शास्त्र चर्चेत पराभूत केले. यातील काही पंडितांची त्यांनी स्थापन केलेल्या चार प्रमुख मठांवर नियुक्ती केली. या मठांद्वारे सनातन धर्माचे कार्य पुढे सुरू ठेवले. शंकराचार्यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language