‘जनता शिक्षित झाली, तरच तिला आपल्या अंगभूत सामर्थ्याचे ज्ञान होईल आणि अंगीकृत कर्तव्याचे भान येईल’, असा महात्मा जोतिराव फुले यांचा विश्वास होता. महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या मुळाशी महात्मा फुले यांचा शिक्षणविचार होता, असे डॉ. द. के. गंधारे यांनी म्हटले आहे.
महात्मा फुले यांच्या शिक्षणविचारांची मांडणी गंधारे यांनी या पुस्तकातून केली आहे. शिक्षण हे सद्गुणांची जोपासना करणारे हवे, असा फुले यांचा कटाक्ष होता. गंधारे यांनी प्रथम फुले यांच्या जीवनचारित्र्याची रूपरेषा सांगून त्यांच्या वाङ्मयाचा परिचय करून दिला आहे. अज्ञानाचे दुष्परिणाम काय होतात, याची जाणीव करून देऊन शिक्षणाच्या दूरगामी परिणामांची ओळख फुले यांनी करून दिली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी त्यांची मागणी होती. हा सर्व भाग या पुस्तकातून समजतो.
प्रकाशक : महात्मा फुले यांचा शिक्षणविचार
पाने : १४४
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)