Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनदेखील करावे
प्राचार्य अभयकुमार साळुंखे दीपप्रज्वलन करताना सोबत डॉ. एस. वाय. होनगेकर, डॉ. नीता पाटील, हितेंद्र साळुंखेकोल्हापूर : ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३०व्या स्मृतीदिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’च्या विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालयात आठ ऑगस्ट रोजी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राचार्य साळुंखे बोलत होते. शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर आधारित पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. 

प्राचार्य अभयकुमार साळुंखे ग्रंथप्रदर्शन पाहताना सोबत डॉ. एस. वाय. होनगेकर, डॉ. नीता पाटील, हितेंद्र साळुंखेकार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीला साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. नीता पाटील यांनी केले तर आभार हितेंद्र साळुंखे यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ग्रंथप्रदर्शनाचे संयोजन केले होते. 

कार्यक्रमाला प्रा. किरण पाटील, प्रा. बी. के. गोसावी, प्रशासकीय सेवक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.   

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZQIBF
Similar Posts
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले
विवेकानंद महाविद्यालयाचा वृक्षलागवड कार्यक्रम कोल्हापूर : राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत कोल्हापूरमधील शाहूवाडी येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ जुलै रोजी सागाच्या १०२ रोपांची लागवड करण्यात आली. डॉ. शरदचंद्र साळुंखे यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ‘देश
विवेकानंद महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी कोल्हापूर : ‘महाराष्ट्राच्या इतिहासात महात्मा फुलेंनी सुरू केलेली सामाजिक चळवळ पुढे नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. वेदोक्त प्रकरणातून त्यांना सामाजिक विषमतेची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी बहुजनांवर होणारा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक अन्याय दूर करण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यांच्या
विवेकानंद महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा कोल्हापूर :  ‘ब्रिटीशांच्या गुलामीतून मुक्त होऊन भारतीय स्वातंत्र्याला आज ७० वर्षे झाली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सर्व युवकांनी राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन समाजकार्यात उतरले पाहिजे व या देशाला प्रगतीपथाकडे नेले पाहिजे.’ असे विचार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language