Ad will apear here
Next
‘पुस्तकांमुळे लेखकाचे अस्तित्त्व टिकून राहते’
पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी राजेंद्र भोसले, अवधूत म्हमाने, योगिराज वाघमारे, राजेंद्र गवळी, श्रीकांत मोरे, डॉ. श्रुती वडगबाळकर, प्रमोद लांडगे, नागनाथ गायकवाड आणि माधव पवार.सोलापूर : ‘मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात जातो, असे म्हटले जाते. याची शाश्वती नाही; परंतु साहित्यिकांचे अस्तित्त्व मात्र पुस्तकरूपाने उरते,’ असे प्रतिपादन ईस्लामपूर येथील गवळी प्रकाशनचे प्रकाशक राजेंद्र गवळी यांनी केले.

येथील शिवस्मारक सभागृहात ६ ऑगस्टला गवळी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सोलापूरच्या पाच लेखकांच्या आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी सोलापूर येथील साहित्य-परंपरेचा गौरव करून सोलापुरातील साहित्यिकांची जास्तीत जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला. 

ज्येष्ठ साहित्यिक व मनोरमा साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ‘भावना व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साहित्य होय. समाजातील संस्कृती व मानवता टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य साहित्य करते,’ असे त्यांनी या वेळी नमूद केले.

प्रमुख वक्त्या डॉ. श्रुती वडगबाळकर म्हणाल्या, ‘आजची युवा पिढी साहित्यापासून दूर जात आहे. संगणक, मोबाईलमध्ये व्यस्त झाली आहे. त्यांच्याकडे जगण्यासाठी ठोस भूमिका नसल्याने नैराश्याने ग्रासल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. संयम व सहनशीलता हे फक्त साहित्यच शिकवते.’

यावेळी योगिराज वाघमारे यांच्या ‘घुसमट’ व ‘गहिवर’ या कादंबऱ्यांचे, अवधूत म्हमाने यांच्या ‘मुलांच्या आवडत्या गोष्टी’ या बालकथासंग्रहाचे, राजेंद्र भोसले यांच्या ‘राजेंद्र भोसले यांच्या निवडक कथा’ व ‘विळखा’ कथासंग्रहांच्या चौथ्या आवृत्तीचे, प्रमोद लांडगे यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या वैचारिक ग्रंथाचे, नागनाथ गायकवाड यांच्या ‘हिरवळीचा कोपरा’ काव्यसंग्रहाचे व ‘टोपीवर टोपी व इतर एकांकिका’ यांचे प्रकाशन झाले.

या वेळी सर्व लेखकांनी मनोगत व्यक्त केले. योगिराज वाघमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कवी माधव पवार यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, ल. सि. जाधव, सुरेखा शहा, गोविंद काळे, शोभा मोरे,  डॉ. शिवाजीराव देशमुख, डॉ. सुहास पुजारी, पद्माकर कुलकर्णी, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. संघप्रकाश दुड्डे, निर्मला मठपती, वंदना कुलकर्णी, विद्या कुलकर्णी, बदीउज्जमा बिराजदार यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPOBF
Similar Posts
पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोलापूर : इस्लामपूर येथील गवळी प्रकाशनाद्वारे सोलापूर येथील लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. या वेळी ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर या प्रमुख पाहुण्या असतील, तर लेखक, लघुपट दिग्दर्शक व प्रकाशक राजेंद्र गवळी अध्यक्षस्थानी असतील
‘टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात’ पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
शेती-प्रगती कृषिभूषण पुरस्कार जाहीर कोल्हापूर : शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ २३ जानेवारी २०१९ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतकरी संघटनेतील जुने कार्यकर्ते आणि मौजे डिग्रज येथील प्रयोगशील शेतकरी जयपालण्णा फराटे, सावळवाडीचे प्रशांत लटपटे, दानोळीचे चवगोंडा अण्णा
फक्त अडीच हजारांत ‘उडान’ नवी दिल्ली : ‘उडान’ या योजनेअंतर्गत देशात तासाभराचा विमान प्रवास केवळ अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विमानप्रवास अनुभवता यावा यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language