पुणे : आषाढसरींच्या सोबतीने उपशास्त्रीय संगीत, अभंगापासून ते गझल, लावणी, कव्वाली, देशभक्तीपर गीते अशा विविध रचनांच्या बरसातीने ‘गान-रस-रंग’ हा कार्यक्रम रंगला.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, २६ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात ‘गान-रस-रंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वृष स्वर’ प्रस्तुत या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण रचनांना रसिकांची भरभरून दाद मिळाली.
अभिजित वाडेकर, वृषाली मावळंकर यांनी गाणी सादर केली. प्रसन्न बाम (हार्मोनियम), अभय गाडगीळ (की-बोर्ड), समीर बंकापूरे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. रंजना काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत केले.