Ad will apear here
Next
‘महाराणा प्रतापसिंह कलादालनामुळे वैभववाडीच्या वैभवात भर’
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करताना पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, मेवाडचे युवराज लक्ष्यराज कुंवर आदी

सिंधुदुर्ग : ‘महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राच्या उभारणीमुळे वैभववाडीच्या वैभवात भर पडली आहे,’ असे प्रतिपादन पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 


या वेळी मेवाडचे युवराज लक्ष्यराज कुंवर, कोल्हापूरचे युवराज खासदार संभाजी छत्रपती, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, रावराणे मंडळाचे अध्यक्ष गणपत रावराणे, उपाध्यक्ष सदानंद रावराणे, वैभववाडीच्या नगराध्यक्ष गजयेबार, तहसीलदार संतोष जाधव आदी उपस्थित होते.

‘देशाच्या इतिहासामध्ये अनेक शूरवीर होऊन गेले;पण त्यातील लक्षात राहण्यासारखे कार्य छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी केले. भविष्यात यशस्वी होण्यासाठी इतिहासाची आठवण असणे गरजेचे आहे. या कलादालनाने महाराष्ट्र व राजस्थानच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे; तसेच मराठा व राजपूत यांची सांगड घालण्याचे कार्य केले आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे कलादालन महत्वाचे आहे. पर्यटनास इतिहासाची जोड दिल्यास त्याचा फायदा पर्यटकांना होतो. पुढील पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने उभारण्यात आलेल्या स्मारकाचा लाभ पर्यटकांनी घ्यावा. या निमित्ताने मेवाड व कोल्हापूरच्या युवराजांना एकत्र आणण्याचा एक नवा इतिहास रचला गेला आहे,’ असे रावल यांनी नमूद केले.


आमदार राणे म्हणाले, ‘पर्यटनाच्या माध्यमातून इतिहासाचे जतन करणे व आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या स्मारकाचा उद्देश आहे.’

संभाजी छत्रपती म्हणाले, ‘या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मेवाडच्या घराण्याशी संबंधीत सर्व वंशजांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. हा इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे.’

नारायण राणे म्हणाले, ‘आजचा काळ तलवारीने लढण्याचा नसून, बुद्धीमत्ता व तंत्रज्ञानाच्या बळावर देशाचा विकास साधण्याचा आहे. आपण समाज, देश व धर्मासाठी काय करु शकतो याचा प्रत्येकाने विचार करण्याचा काळ आहे. देशाच्या विकासामध्ये आपण दिलेले योगदान हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या कार्याचाच एक भाग असेल.’  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करावे; तसेच देशातील पहिले सी वर्ल्ड सिंधुदुर्गात सुरू करावे अशी विनंती त्यांनी रावल यांना केली. 

मेवाडचे युवराज लक्ष्यराज कुंवर
‘विमानतळ व दोन पंचतारांकीत हॉटेल्स लवकरच सुरू करण्यात येतील आणि सी वर्ल्डबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल,’ असे रावल यांनी सांगितले.

संतोष सावंत यांनी प्रास्ताविक केले, तर रावराणे मंडळातर्फे मान्यवरांचे स्वागत व नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVPBW
Similar Posts
नीलेश राणे एक एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश नारायणराव राणे हे एक एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, देवगडचे आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
दांडी येथील महिलांना घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मालवण : दांडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार महिलांना विविध प्रकारच्या घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
मराठी सक्तीची मागणी करणाऱ्या आंदोलनाला ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचा पाठिंबा मालवण : ‘महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत मराठी सक्तीची झालीच पाहिजे,’ या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आहे. २४ जून २०१९ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मराठी संस्थांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language