Ad will apear here
Next
... आणि त्यांचे चेहरे ‘सौभाग्या’ने उजळले!
सौभाग्य योजनेचा लाभ मिळालेल्या फोंडे कुटुंबीयांसमवेत मंगेश दळवी.देवरुख : देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होऊन गेली, तरी अजूनही काही दुर्गम भागांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याजवळची दख्खन पूर्व धनगरवाडी हा त्यापैकीच एक भाग. नैसर्गिक अडचणींमुळे येथे अजूनही वीजपुरवठा होऊ शकला नव्हता; मात्र अलीकडेच ‘सौभाग्य’ योजनेमुळे आणि माजी सरपंच मंगेश दळवी यांच्या प्रयत्नांतून या वाडीतील तीन घरे सौर ऊर्जेवर प्रकाशमान झाली आहेत. अनेक पिढ्यांचे स्वप्न सत्यात उतरल्यामुळे त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले!

दख्खन पूर्व धनगरवाडी हे गाव रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटाजवळ निबिड अरण्यात वसले आहे. त्यामुळे बिबट्या, गवा रेडे, रानडुकरे यांचा उपद्रव कायमच. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी वीज असणे अत्यंत आवश्यक; मात्र दुर्गमतेमुळे २१व्या शतकातही येथील नागरिक अंधारात होते. या धनगरवाडीची लोकसंख्या केवळ ५७ आहे. या गावात नऊ कुटुंबे जीव मुठीत घेऊन दिवस काढताहेत. विजेसह पायाभूत सोयीसुविधा सहजासहजी उपलब्ध नसल्याने अनेकांनी स्थलांतर केल्याने येथील लोकसंख्या कमी झाली आहे. सध्या येथे वास्तव्याला असलेली कुटुंबे शेती करतात. तसेच कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसायावर उदरनिर्वाह करतात. ही वाडी गावातील मुख्य वस्तीपासून काही किलोमीटर दूर आहे. त्यामुळे नवीन जोडणीसाठी विजेचे खांब नेण्याकरिता काही लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे या गावात वीज देण्यास ‘महावितरण’ने असमर्थता दर्शवली.  

या भागात विजेची सुविधा मिळावी, यासाठी तत्कालीन सरपंच मंगेश दळवी यांनी पाच वर्षांपूर्वी पाठपुरावा सुरू केला. स्थानिक पातळीवर काही होत नाही हे पाहून त्यांनी हा विषय थेट केंद्रीय ऊर्जामंत्र्यांपर्यंत नेला. मंत्रालयातून आदेश आल्यावर ‘महावितरण’ने सर्वेक्षण केले. मात्र नैसर्गिक अडचणींपुढे कुणाचे काहीच चालेना. विजेचे खांब उभारण्यासाठीचे आर्थिक गणित परवडण्यासारखे नव्हते. 

यातून मार्ग काढण्यासाठी दळवींनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. अखेर महाऊर्जा – ‘मेडा’च्या वतीने (महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणा) ‘सौभाग्य’ योजनेअंतर्गत या कुटुंबांना सौर ऊर्जेच्या मदतीने वीज देण्याचे निश्चिहत करण्यात आले. सध्या गावात वास्तव्याला असलेल्या नऊ कुटुंबांपैकी रवींद्र धोंडू फोंडे , सोमा बिराजी फोंडे, पांडुरंग विठू फोंडे या तीन कुटुंबांना प्रत्येकी एक सौर ऊर्जा युनिट देण्यात आले. त्यात पाच ट्यूब, एक पंखा, एक चार्जर, एक अतिरिक्त पॉइंट या गोष्टींचा समावेश आहे. याची जोडणी करून नुकतीच धनगरवाडीतील ही तीन घरे कायमस्वरूपी प्रकाशमान झाली आहेत. रात्रीच्या काळोखात चमकणारे दिवे पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. या कामी ‘महावितरण’च्या साखरपा कार्यालयाचे मोठे सहकार्य लाभले.

‘अजूनही वाडीतील सहा कुटुंबे यापासून दूर आहेत. या सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेत. जेव्हा ही संपूर्ण वाडी प्रकाशमान होईल, तेव्हा मला शांतता लाभेल. या कामात सहकार्य करणाऱ्या ‘महावितरण’चे खूप आभार,’ अशी प्रतिक्रिया माजी सरपंच मंगेश दळवी यांनी व्यक्त केली. 

संपर्क : मंगेश दळवी – ९४२३२ ९३०६०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZLBBV
 सरपंच मंगेश दलवी साहेब यांचा खूप हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
Similar Posts
मुलांनी घेतली ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची शपथ देवरुख : फटाकेमुक्त दिवाळी हा विषय दर वर्षीप्रमाणेच यंदाही चर्चेत आला आहे. यंदा त्याला न्यायालयाच्या निकालाची पार्श्वभूमी आहे. अर्थात, दिवाळी प्रत्यक्षात फटाकेमुक्त झालेली मात्र दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी
पुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील देवरुख : महिला बचत गटांच्या पारंपरिक व्यवसायाला छेद देऊन रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील श्री सद्गुरू सेवा सहकारी संस्थेतील महिलांनी एक नवी वाट चोखाळली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने या गटातील महिलांनी आकाशकंदील बनवण्याची ऑर्डर स्वीकारली असून, त्यांनी बनविलेले
... आणि मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाह झाला! देवरुख : सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळनगरीत (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या हजारो भाविकांनी आज (१५ जानेवारी २०१९) मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री देव मार्लेश्वर आणि कोंडगावची वधू गिरिजादेवी यांचा विवाह दुपारच्या मुहूर्तावर झाला
‘पॉझिटिव्हिटी’ त्यांच्या रक्तातच आहे! देवरुख : रक्तदान करण्याबद्दल जनजागृती चांगलीच वाढली आहे. तरीही एखाद-दुसऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी नसते. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील उदय गणपत उर्फ बंधू कोळवणकर यांचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ठरते. आता ५२ वर्षांचे असलेल्या उदय यांनी आतापर्यंत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language