Ad will apear here
Next
बौद्धिक संपदा हक्क यादीत भारत ३६व्या स्थानावर
गेल्या वर्षीच्या ४४व्या स्थानावरून आघाडी
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्क यादीत ५० देशांच्या यादीत भारताने ३६ वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या ४४ व्या क्रमांकावरून यंदा भारताने तब्बल आठ स्थानांची आघाडी घेतली आहे.  

अमेरिकेच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सने गुरुवारी, ७ फेब्रुवारी २०१९ रोजी वार्षिक आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा यादी जाहीर केली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 
‘पेटंट आणि बौद्धिक हक्क अंमलबजावणी याबाबतीतली आव्हाने कायम असूनदेखील भारताने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे,’ असे अमेरिकेच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरने म्हटले आहे.

या क्रमवारीत अमेरिकेने ४५ पैकी ४२.६६ गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यानंतर ४२.४४ गुणांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर, ४१.०३ गुणांसह स्वीडन तिसऱ्या आणि ४१ गुणांसह जर्मनी चौथ्या स्थानावर आहेत. भारताने यंदा ४५ पैकी १६.२२ गुण मिळवले आहेत. गेल्या वर्षी भारताला ४० पैकी १२.०३ गुण मिळाले होते. 

‘सलग दोन वर्षे भारताने मोठी प्रगती केली असून, इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली कामगिरी केली आहे. या क्रमवारीसाठी ९० टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश असलेल्या निर्देशांकाचे मापन केले जाते,’ असे जीआयापीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किल्ब्राईड यांनी म्हटले आहे.

‘जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रेरक आणि पोषक वातावरण निर्माण केले जात आहे. याचा फायदा नवीन पिढीला होणार असून, २१ व्या शतकातील मुक्त आधुनिक संशोधनाला वाव मिळणार आहे. यामुळे माहिती आधारित अर्थव्यवस्था निर्माण होण्यास मदत मिळणार आहे,’ असेही पॅट्रिक किल्ब्राईड म्हणाले. 

‘भारत या क्रमवारीतील आघाडीचा उपयोग आणखी पुढे जाण्यासाठी करेल, अशी आशा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेलाही भारताच्या या प्रगतीचा फायदा होतो,’ असेही त्यांनी नमूद केले. 

‘या क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थेशी भारतीय व्यवस्था संलग्न होईल असे बदल, याचा परिणाम म्हणून भारताने ही आघाडी घेतली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या इंटरनेट करारात सहभाग, जपानशी पेटंट प्रॉसिक्युशन हायवे करार, लहान व्यवसायांनाही बौद्धिक हक्क संपदेसाठी संरक्षण देण्यासह पेटंटच्या प्रलंबित प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही सुधारणा करण्यात आल्या आहेत,’ असे या अहवालात म्हटले आहे. 

‘भारताने बौद्धिक संपदा क्षेत्रातील कामगिरी सुधारण्याकरता २०१८ मध्ये अनेक उल्लेखनीय पावले उचलली आणि या वर्षी या क्रमवारीतील नवीन निकषांवरही चांगली कामगिरी केली आहे. त्याबद्दल भारतातील धोरणकर्ते अभिनंदनास पात्र आहेत,’ असेही यात नमूद करण्यात आले आहे. 

गेल्या काही वर्षात भारतातील प्रशासन देशातील बौद्धिक संपदा वातावरण सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या इंटरनेट करारात भारताने प्रवेश केला तसेच जपानशी पेटंट करार केला. या दोन्ही उल्लेखनीय बाबी आहेत. पेटंट आणि ट्रेडमार्क संबंधित प्रलंबित प्रकरणे राहू नयेत यासाठीही प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. मार्च २०१७ मध्ये तब्बल दोन लाखांहून अधिक पेटंट अर्ज प्रलंबित होते, जून २०१८ पर्यंत ही संख्या एक लाख ५५ हजारांवर आणण्यात आली. ट्रेडमार्कची साडेचार लाखांहून अधिक प्रकरणे शिल्लक होती, असेही या अहवालात म्हटले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUXBX
Similar Posts
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त जनजागृती पुणे : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने पुण्यात भारती विद्यापीठाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताला विविध वस्तूंची पेटंट मिळवून देणारे प्रा
१७व्या लोकसभेत विक्रमी ७८ महिला खासदार नवी दिल्ली : राजकारणात महिलांचा टक्का वाढताना दिसत असून, नुकत्याच झालेल्या १७व्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७२४ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते; त्यापैकी ७८ जणींना खासदारपदाची संधी मिळाली आहे. लोकसभेतील महिला खासदारांची ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. त्यापैकी ४१ महिलांनी या आधीही खासदारपदाची जबाबदारी सांभाळली आहे
ऐतिहासिक सिमला परिषदेचे चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात पुणे : देशाच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील अनमोल खजिन्यात दुर्मीळ ठेव्याची भर पडली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सिमला परिषदेचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाले आहे. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी असे दिग्गज या चित्रफितीत पाहायला मिळणार आहेत
नेपाळशी मैत्रीला कराराचे ‘इंधन’ नवी दिल्ली : भारताने नेपाळला दर वर्षी १३ लाख टन इंधनाचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. या करारानुसार इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी पुढील पाच वर्षे नेपाळला पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा नैसर्गिक वायू, केरोसीन, हवाई इंधन यांचा पुरवठा करणार आहे.  भौगोलिकदृष्ट्या भारत आणि चीनच्या मध्यभागी असणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language