पुणे : पुराच्या तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील गावांमध्ये अनेक ठिकाणांहून मदत पोहोचत आहे; पण आभाळच कोसळल्यावर ठिगळ तरी कुठे, कुठे लावणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मदतीच्या हातांमध्ये आपलाही एक हात असावा या उद्देशाने आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता संस्थेचे सहाशे कर्मचारी आणि आतापर्यंत नावनोंदणी केलेले साधारण सातशे पालक असे तेराशे लोक टप्प्याटप्याने १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत मदतकार्य करणार आहेत. गावांमध्ये जाऊन स्वच्छ्ता करणे हा या तुकडीचा मुख्य उद्देश असून, त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.
ज्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी येता येणार नाही, ते वस्तूरूपाने मदत करू शकतात. आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या सर्व शाखांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मदत देता येईल. यामध्ये मेणबत्ती, चादर, सतरंजी, मॅगी पॅकेट, झाडू, खराटा, सुपली, मिल्क पावडर, बिस्कीट, बेडशीट, लायटर, सॅनिटरी नॅपकिन, तुरटी, सॅव्हलॉन, प्लास्टिक कॅन, औषधे स्वीकारली जातील. दिलेल्या गोष्टींची पोचपावती दिली जाईल.
प्रत्यक्ष गावात जाऊन काम करू इच्छिणाऱ्या लोकांनी संस्थेकडे नावनोंदणी करावी. त्यामुळे तुकड्या करणे, जाण्या-येण्याचे, कामाचे नियोजन करणे सोपे जाईल.
नावनोंदणी संपर्क : संदीप माळी : ९१३०० ६४४८८
स्थळ : आर्यन्स वर्ल्ड स्कूल, दत्तनगर
वेळ : १४ ऑगस्ट, सकाळी ८:३० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत.