Ad will apear here
Next
राष्ट्रीय संस्कृत संस्थानतर्फे नऊ ऑगस्टला रत्नागिरीत शिक्षण केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गेली चार वर्षे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू आहे. यंदाच्या वर्गाचे उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.

हा वर्ग ऑगस्ट २०१९ ते एप्रिल २०२० या काळात चालू राहील. संस्कृत भाषा प्रमाणपत्रीय पाठ्यक्रम व संस्कृत भाषा दक्षता पाठ्यक्रम असे दोन अभ्यासक्रम यात शिकविले जाणार आहेत. संस्कृत शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, डॉक्टर अशी कोणीही जिज्ञासू व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते. 

यासाठी संस्कृतचे पूर्वज्ञान आवश्यक नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा आहे. संस्कृतमध्ये अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. संस्कृत भाषा हा आपला समृद्ध वारसा आहे. याकरिता संस्कृतचे ज्ञान सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी तयार केलेले हे अभ्यासक्रम आहेत. 

या अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत मिळतील. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल. संस्कृत श्रवण, संभाषण, वाचन, लेखन अशा भाषा कौशल्यांचे अध्यापन केले जाईल. अशी माहिती देण्यात आली. 

अधिक माहितीसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख तथा कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये (७७२०० ३२३०२) व हिरालाल शर्मा (८८९४६ ४९५१४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


हेही जरूर वाचा : 










 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZWPCD
Similar Posts
संस्कृत शिक्षणाची चळवळ मोठी व्हायला हवी रत्नागिरी : ‘संस्कृत शिक्षणाची चळवळ आणखी कशी मोठी होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ही चळवळ माध्यमिक शाळांपर्यंत पोहोचवण्याकरिता मी नक्कीच मदत करीन. परंतु लहान मुलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतले पाहिजे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले
संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा रत्नागिरी : ‘संस्कृतमध्ये सर्व शास्त्रांवर ग्रंथ आहेत. संस्कृतमधील तत्त्वज्ञान आणि विचार उदार आणि विश्वबंधुत्वाचे आहेत. भारताचा तिरंगा ध्वज भारतीयांना एकत्र आणतो, त्याप्रमाणे संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संस्कृत शिकले पाहिजे,’ असे प्रतिपादन गोदूताई जांभेकर विद्यालयातील
विविध कार्यक्रमांनी रंगले संस्कृत स्नेहसंमेलन रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे रविवारी (१७ फेब्रुवारी) संस्कृत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या संमेलनात गीत, नृत्य, समूहगायन, कथाकथन,
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language