आताच्या यांत्रिक युगात शिक्षणात विशेष प्रावीण्य असणे आवश्यक असते, तसेच कौशल्यानुसार काम करण्याची तयारीही ठेवावी लागते, असे सांगत भौतिक सुविधांच्या वापरासाठी अर्थप्राप्तीशिवाय पर्याय नसतो. यासाठी मिळकत, बचत व खर्च यांचे गणित कसे जुळवावे, याबद्दल डॉ. डी. एस. काटे यांनी ‘अर्थनीती’मधून मार्गदर्शन केले आहे. पैसा अविचाराने खर्च केल्यास ओढवणाऱ्या स्थितीचे आकलन त्यांनी करून दिले आहे.
भारतातील करप्रणालीचा इतिहास सांगत सध्या अप्रत्यक्ष कराचा बोजा कसा वाढला आहे., हे स्पष्ट केले आहे. अर्थसाक्षरतेचे महत्त्व, औषध दरांची नफेखोरी, सोन्याचे राष्ट्रीयीकरण, अर्थसाक्षरतेचे महत्त्व, चलनाची चणचण, बँक गैरव्यवहार, आभासी चलन आदी विषयांवर प्रकाश टाकला आहे.
स्वदेशी वस्तूंचा वापर, युवकांच्या रोजगारसंधी व आव्हाने, भारतातील समस्या, दुभंगलेली, अर्थव्यवस्था, बेगडी उत्सव संस्कृती, किसानदिन, अन्ननासाडी, प्रदूषण, कचरा, प्लास्टिक, पर्यावरण संतुलन आदी प्रश्नांवर यात चर्चा केली आहे. गांधीजींच्या स्वप्नातील अर्थसमानता व अर्थसंकल्पीय लेखाजोखाही मांडला आहे.
पुस्तक : अर्थनीती
लेखक : डॉ. डी. एस. काटे
प्रकाशक : आदित्य प्रकाशन
पाने : ११०
किंमत : १२० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)