‘सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे दारू दुकानांसमोर झालेली गर्दी, लांब रांगा व सोशल डिस्टन्सिंगची तोडमोड झालेली सर्वांनी पाहिली. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ‘राज्य शासनांनी घरपोच दारू पुरवण्याचा विचार करावा’ अशी सूचना केली आहे; पण घरपोच दारू पोहोचवली गेली, तर ते करोना आणि हिंसा घरपोच केल्यासारखेच होईल आणि आर्थिक फायद्यापेक्षाही खूप मोठा तोटा देशाला सोसावा लागणार आहे. शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ डॉ. अभय बंग यांनी मांडले आहे. त्यांचा हा व्हिडिओ जरूर पाहा...