Ad will apear here
Next
‘समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न’
राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात प्रा. तेज निवळीकर यांचे प्रतिपादन
डावीकडून प्रकाश जवळकर, प्रकाश रोकडे, प्रा. वसंत सपकाळ, प्रा. तेज निवळीकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अशोककुमार पगारिया, बबनराव भेगडे व डॉ. अशोक शिंदे.

पुणे : ‘संत गाडगेबाबा हे कृतीशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या भोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे गाडगेबाबांचे स्वप्न होते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आणि गाडगेबाबांचे अभ्यासक प्रा. तेज निवळीकर यांनी केले.

भोसरी येथील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. साहित्यातून सामाजिक सुधारणेचा विचार पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. ललिता सबनीस, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, बंधुता प्रतिष्ठानचे प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, व्याख्याते प्रा. निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर पीपल्स बॅंकेचे चेअरमन बबनराव भेगडे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, ‘संविधानाचा विचार सगळीकडे पोहोचविण्यासाठी बंधुता हे मूल्य अतिशय आवश्यक आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षाही वैचारिक श्रीमंती अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे बंधुतेचे हे तत्वज्ञान श्रीमंतांपर्यंत पोहोचवायला हवे. आज समाजात अशांतता असण्याचे कारण हे बंधुतेचा अभाव आहे. स्वातंत्र्य, समता यासह बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनाही आपण प्राधान्य दिले पाहिजे. माणसांच्या मनातील भेद जाळण्यासाठी बंधुता मनात रुजायला हवी.’

रोकडे म्हणाले, ‘बंधुतेचा विचार घेऊन गेली २० वर्षे समाजात जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून राष्ट्रीय बंधुता संमेलने घेतली जात आहेत. रा. ग. जाधव यांच्यापासून डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यापर्यंत अनेक मान्यवर साहित्यिकांनी या संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही परंपरा यापुढेही अशीच चालू राहील.’

या वेळी २१व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची निवड करण्यात आली. बबनराव भेगडे, डॉ. अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब जवळकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVGBW
Similar Posts
‘बंधुतेशिवाय स्वातंत्र्य, समता अर्थहीन’ पुणे : ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या चार मूलभूत तत्वांवर भारताचे संविधान आधारले आहे. त्यातील केवळ स्वातंत्र्य व समता या दोन गोष्टींवरच अधिक भर दिला गेल्याने बंधुतेला दुय्यम स्थान मिळाले. परिणामी आज जाती-धर्म, गरीब-श्रीमंत अशा वर्गीय संघर्षात आपण अडकलो आहोत. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य व समतेला अर्थ नाही
‘बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने नकोत’ पुणे : ‘अनुभवातून लिहिलेले साहित्य कसदार असते. स्त्रियांनी आपल्या अनुभवांवर आधारित साहित्य निर्माण केले पाहिजे. बाईचा माणूस म्हणून विचार होण्यासह त्यांना मुक्तपणे लिहिता आले पाहिजे; मात्र आज बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने आहेत. स्त्रियांनी भाषेवरील ही पुरुषी बंधने झुगारून कसदार साहित्य निर्मिती केली पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सत्काराचे आयोजन पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होईल
‘समाज परिवर्तनासाठी बंधुता अत्यंत आवश्यक’ पुणे : ‘संत किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती,धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती,धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवले. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती,धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसामाणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले जात आहे. समाजात परिवर्तन घडवायचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language