Ad will apear here
Next
दिव्यांगांसाठी राजापूरला स्वावलंबन कार्ड नोंदणी शिबिर


रत्नागिरी :
राजापूर बाजारपेठेतील नगर परिषद हॉलमध्ये (पिक अप शेड हॉल) ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता दिव्यांग मेळावा व स्वावलंबन कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर नगर परिषद व रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतींसाठी वेगवेगळी कार्डस् बनवावी लागतात. त्यामुळे एखादे कार्ड नसेल, तर ती सवलत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी आधार कार्डप्रमाणे स्वावलंबन कार्ड तयार केले आहे. भविष्यात दिव्यांगांना या कार्डच्या माध्यमातून एका कार्डवरच सर्व सोयी-सवलती मिळणार आहेत. म्हणूनच या कार्डसाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मेळावा व शिबिराचे उद्घाटन राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जमीर खलिपे करणार आहेत. या वेळी मुख्याधिकारी नयन ससाणे, रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नोंदणी शिबिराला येताना दिव्यांगांनी अपंगत्व प्रमाणपत्राची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स, अलीकडे काढलेला एक फोटो ही कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वावलंबन कार्डचे शुल्क १०० रुपये आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 
सादिक नाकाडे – ८३२९ ५३४९७९
प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे – ९४२२३ ८२१३६
विनायक पवार – ८०८७२ ९७८०९
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZJGBS
Similar Posts
राजापुरातील दिव्यांग मेळाव्याला प्रतिसाद राजापूर : राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राजापूरमध्ये नुकताच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विविध योजनांसाठीचे फॉर्मही भरून घेण्यात आले.
‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’ रत्नागिरी : ‘रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन संस्था सच्चा समाज निर्माण करण्याचे काम करत आहे. दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यावर भर देते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी समाज, शासकीय यंत्रणा, शासन-प्रशासनाने आत्मविश्‍वास दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.
... आणि व्हीलचेअरवर लग्न लागलं...! रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नवेट-हरचिरी येथील चि. सौ. कां. सुवर्णा येरीम आणि शिरोळ (कोल्हापूर) येथील चि. योगेश खाडे यांचा विवाह नुकताच थाटात पार पडला. सुवर्णा पोलिओग्रस्त आहे, तर योगेशला अपघातामुळे अपंगत्व आलेले आहे. व्हीलचेअरवरून आलेल्या या नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language