भटकंती म्हणजे केवळ मौजमजा नव्हे; तर भटकंती म्हणजे नवनवीन ठिकाणे पाहाणे, संबंधित परिसराची माहिती मिळवणे, तेथील भौगोलिक-सामाजिक ज्ञान वाढवणे, इतिहास जाणून घेणे. ओंकार वर्तले यांच्या या पुस्तकाने नेमके हेच साध्य केले आहे. सह्याद्रीतील कडेकपारी हे भटक्यांचे लाडके ठिकाण. सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणांची सफर वर्तले यांनी या पुस्तकातून घडविली आहे.
हा लेखन प्रवास पद्यावती लेणींपासून सुरू होतो. कोथळेगड, कलागड, कर्णेश्वर, सोनगीर किल्ला, कन्हेरगड असे किल्ले या प्रवासात सोबतीला येतात. घोरवडेश्वर, कांब्रे लेणी, कोंडणा लेणी, दुर्गेश्वर लेणी असे लेणीसौंदर्य भेटते. अंबरनाथचे प्राचीन शिवालय, झोड्गेचे शिवालय अशी ठिकाणेही समजतात.
प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १७६
किंमत : १७० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)