Ad will apear here
Next
ते पंधरा दिवस
ऑगस्ट १९४७ हा काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. एक ते १५ ऑगस्ट या स्थित्यंतराच्या काळातील आणि भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या १५ दिवसांची गाथा प्रशांत पोळ यांनी ‘ते पंधरा दिवस’मधून कथन केली आहे. 

याची सुरुवात होते ती एक ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांचा काश्मीर दौरा आणि गिलगीटच्या हस्तांतराच्या घटनांनी. त्यानंतर दोन ऑगस्टला ब्रिटिशांकडून होणाऱ्या हस्तांतराची सुरू झालेली धावपळ, पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे काम, पुणे, श्रीनगर, तत्कालीन मद्रास या भागातील घडामोडी, तीन ऑगस्ट रोजी गांधीजींच्या काश्मीर दौऱ्याचे फलित, बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून नियुक्त केल्याचे नेहरूंचे पत्र, चार ऑगस्ट रोजी व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांच्या बैठकी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गुरुजी यांचा सिंध दौरा, अशा दररोजच्या घटनांचे चित्रण यात आहे. १५ ऑगस्टला भारतात स्वातंत्र्याची पाहत उगवली. त्या दिवसाचे वर्णन, विविध ठिकाणची परिस्थिती, नेत्यांची अवस्था याचा मागोवा घेतला आहे.       

पुस्तक : ते पंधरा दिवस
लेखक : प्रशांत पोळ
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन 
पाने : १५९ 
किंमत : १९० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZXBCC
Similar Posts
भारतीय ज्ञानाचा खजिना मुस्लीम आक्रमणापूर्वी भारताचे जगावरील प्रभाव, ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीबाबत भारत देश कसा श्रेष्ठ होता, यावर प्रशांत पोळ यांनी ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ यावर लिखाण केले आहे.
मराठे व इंग्रज पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language