Ad will apear here
Next
‘बौद्धिक संपदा व पेटंट’ विषयावर प्रा. हिंगमिरे यांचे व्याख्यान
प्रा. गणेश हिंगमिरेपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘नवीन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’या विषयावर प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात गुरुवारी, २५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. महाविद्यालये व विद्यापीठात अनेक संशोधने होत असतात; तसेच अभियंते-शास्त्रज्ञ प्रयोग करून नवीन निर्मिती करतात. ही बौद्धिक संपदा चोरली जाते किंवा तिची कॉपी केली जाते. परिणामी मूळ संशोधकाला त्याच लाभ होत नाही. त्यामुळे पेटंट मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरते. भारतीय पेटंटचे महत्त्व, भारतातील पेटंट फाइल्सची वर्तमान स्थिती, पेटंट हक्काचे आर्थिक महत्त्व, भारतीय पेटंट संरक्षणाची जागतिक परिस्थिती, भौगोलिक निर्दर्शन अशा विविध मुद्द्यांवर प्रा. हिंगमिरे मार्गदर्शन करणार आहेत.

 ‘अधिकाधिक विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZJDCC
Similar Posts
‘बौद्धिक संपदेबाबत भारतीयांनी सजग राहायला हवे’ पुणे : ‘भारतीय लोकांची बुद्धिमत्ता पाहता आपल्याकडे सर्वाधिक पेटंट असायला हवेत; परंतु जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी पेटंट आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा,
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ विषयावर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवारी, २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे
‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ पुणे : ​‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य
‘ज्ञानार्जनाला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक’ पुणे : ‘आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोबाइलसारख्या उपकरणाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेव्हा शिक्षकांनी अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत अध्यापन करावे. ज्ञानार्जन करताना त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर आणि आनंददायी होईल,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language