Ad will apear here
Next
‘कीर्तनसंध्या’मधून उलगडणार स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय योद्ध्यांची कहाणी
रत्नागिरी : स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. ‘योद्धा भारत’ हा या वेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या कीर्तनांनी आठ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० या कालावधीत हा महोत्सव रत्नागिरीत पार पडणार आहे.

कीर्तन म्हणजे महाराष्ट्रातील समाजजागृतीची सर्वांत जुनी प्रभावी कला आहे. त्या परंपरेनुसार रत्नागिरीत २०१२पासून दर वर्षी समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य कीर्तनसंध्या महोत्सवातून केले जात आहे. युवा पिढीवर चांगले, योग्य धार्मिक संस्कार रुजवणे, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभावना जागवणे, इतिहासाचे खरे ज्ञान देणे, समाजाबाबतचा आदरभाव जागवण्याचे ध्येय समोर ठेवून कीर्तनसंध्या उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, महाराणी ताराबाई, पेशवाईचा कालखंड, मराठ्यांचा इतिहास, भारताचे स्वातंत्र्यपर्व असे विषय कीर्तनातून मांडण्यात आले आहेत. 

स्वातंत्र्य मिळाले, तरी ते टिकविणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्यही युद्धे होतच असतात. चीन आणि पाकिस्तानचे आक्रमण, सीमारेषेवर सातत्याने होणाऱ्या कुरबुरी यांमुळे देशात अशांतता पसरू शकते; मात्र अशा वेळी भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढून आणि प्रसंगी बलिदान करून अनेक योद्ध्यांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवायला मदत केली. भारतीय स्वातंत्र्यापासून कारगिल युद्धापर्यंतचा हाच इतिहास या वेळी ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात मांडला जाणार आहे.
रत्नागिरीत आठवडा बाजारानजीकच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आठ ते १२ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. महोत्सवात आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन) आणि अभिजित भट (गायन) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रम मोफत असला, तरी अशा भव्य कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असते. समाजाच्या विविध घटकांकडून ती पुरविली जात आहे. या वर्षीही भरीव आर्थिक मदतीची गरज असून, दात्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक मदतीचा एक भाग म्हणून देणगी सन्मानिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या मानस जनरल स्टोअर्स (माळनाका, रत्नागिरी – ९०११६ ६२२२०), श्री धन्वंतरी आयुर्वेद (मारुती मंदिर ९४२३२ ९२४३७), नितीन नाफड (मारुती मंदिर – ८३०८८ १३१५८), गुरुकृपा रेडिओ हाउस (टिळक आळी- ९८९०८ २७००६), गौरांग आगाशे (साळवी स्टॉप – ९७३०३ १०७९९), सौ. लोवलेकर (जेल रोड – ९८२२० ७१२५०), श्रीकांत सरदेसाई (९४२११ ४२४९८), श्रीराम गोडबोले (पावस ९४२१२ ३८८२४) येथे उपलब्ध आहेत. आठ जानेवारीपासून महोत्सवाच्या ठिकाणीही सन्मानिका उपलब्ध होतील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUVCI
Similar Posts
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव यंदा ‘योद्धा भारत’ या विषयावर रत्नागिरी : ‘योद्धा भारत’ म्हणजेच स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आढावा हा या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाचा विषय आहे. नवव्या वर्षात पदार्पण करतानाच दशकपूर्तीकडे वाटचाल करणारा कीर्तनसंध्या महोत्सव नव्या वर्षाच्या प्रारंभी, आठ ते १२ जानेवारी २०२० या काळात रंगणार आहे
राष्ट्रउभारणीसाठी वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व घडवायला हवे रत्नागिरी : ‘समाजातील चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आणि त्या बाजूने बोलण्यासाठी धाडस आणि चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते. त्यातून कर्तृत्व घडत जाते आणि त्यातूनच टप्प्याटप्प्याने नेतृत्व घडते, जे राष्ट्रउभारणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या कार्यामध्ये सध्या प्राध्यापकांचा सहभाग फारसा दिसत नाही
इंदिराजींच्या कणखर भूमिकेमुळे १९७१च्या युद्धात भारताचा विजय रत्नागिरी : ‘अमेरिका, इंग्लंड अशा बलाढ्य देशांचा दबाव असूनही, कणखर राहून त्याकडे साफ दुर्लक्ष करून १९७१ साली झालेल्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी केली. त्यांच्या कणखरतेमुळेच पाकिस्तानचे विभाजन करण्यात यश मिळाले. त्याआधीच्या सरकारांनी केलेल्या चुका त्यांनी केल्या नाहीत,’ असे प्रतिपादन
काश्मीरविषयीचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा रत्नागिरी : ‘काश्मीरला देशातला दुसरा देश म्हणून मान्यता देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारतीय इतिहासातला सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हे कलम रद्द केल्यामुळे काश्मीरसह देशभरात शांतता प्रस्थापित व्हायला मदत होईल,’ असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी रत्नागिरीत व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language