कोणतीही साधना करायची असेल, तर ध्यान आवश्यकच असतो. ध्यानामुळेच मन एकाग्र होते, तल्लीन होते असे सांगत वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी २००९ मध्ये पुष्कर क्षेत्री ‘ध्यान’ या विषयवार दहा विवेचने केली होती. ती ‘ध्यानातून ध्यायाकडे’ या नावाने ग्रंथ रूपात सादर केली आहेत.
ध्यान म्हणजे नेमके काय, हे अभ्यासताना अध्यात्मिक संदर्भ, वैद्यानिक संदर्भ, ध्यान कशासाठी करायचे, ध्यान कोणी व कसे करावे, ध्यानयोगाची मर्यादा, नियम, आसन, प्रत्याहार, समाधी याबद्दल माहिती दिली आहे. ध्यान करताना येणारे अडथळे व त्यावरील उपायही दिले आहेत.
ध्यानासाठी सहाय्यक गोष्टी, तयारी, तसेच विविध उपाय केले, तरी मन एकाग्र होत नसेल त्या वेळी त्या ध्यानासाठी कोणत्या बाह्य प्रतीकांची निवड करावी, नाम, मंत्र, स्तोत्र, ऋचा आदी ध्वनींच्या प्रकारांवर केल्या जाणाऱ्या ध्यानपद्धतीचा अभ्यास, प्रकाश शक्तीवरील ध्यान, श्वासगतीवरील ध्यान, कुंडलिनी महायोग आदी विषयांवर माहिती यातून मिळते.
प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे
पाने : २६३
किंमत : २७० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)