Ad will apear here
Next
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक, तसेच ई-बुकच्या प्रकाशनप्रसंगी  मिलिंद देव, ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर व लेखिका डॉ. वृषाली पटवर्धन

पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तर ई-बुकचे प्रकाशन वैश्विक सिद्ध साधनेचे मार्गदर्शक आध्यात्मिक गुरू मिलिंद देव यांच्या हस्ते झाले. या वेळी पुस्तकाच्या लेखिका डॉ. वृषाली पटवर्धन उपस्थित होत्या. 

राजा जनक आणि आत्मज्ञानी अष्टावक्र मुनी यांच्यातील संवादांचे मार्मिक विवेचन करून, साधकांना आत्मज्ञानाच्या दिशेने नेमका प्रवास कसा करावा हे सांगणारा हा ग्रंथ आहे. 

या ग्रंथासंबंधी बोलताना मिलिंद देव म्हणाले, ‘हा जनकाचा आत्मसंवाद असून, अष्टावक्र म्हणजे आठ मितींनी व्यापलेले आत्मज्ञान होय. या ग्रंथामध्ये ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य प्राप्तीसाठी काय केले पाहिजे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आध्यात्मिक आवड असणाऱ्या प्रत्येकाने याचा अभ्यास केला पाहिजे’.

मंदार जोगळेकर म्हणाले, ‘साहित्य हा प्रकार आपली संस्कृती जगभर पोहचवतो. स्वत:च्या प्रगतीसाठीही  साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते. मराठी पुस्तक जगभर पोहोचवण्यासाठी ‘बुकगंगा’च्या मार्फत एक यंत्रणा उभारली आणि १५ हजार मराठी ई-बुक्स ‘बुकगंगा’तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहेत’. 

डॉ. वृषाली पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त करून ग्रंथांतील निवडक श्लोकांचे विवेचन केले. मिलिंद देव यांनी उपस्थित साधकांना ध्यानसाधनेसाठी मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरा देव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा कावतकर यांनी केले, तर संस्थेचे सचिव विनायक पटवर्धन यांनी आभार मानले.

(अष्टावक्र नाथगीता हे पुस्तक आणि ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZKXCC
Similar Posts
‘अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्परसंवाद ठेवला पाहिजे’ पुणे : ‘भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत;मात्र बऱ्याचदा त्याचे पालन होत नाही. परिणामी लोक अधिकाऱ्यांकडून करावयाची कामे घेऊन लोकप्रतिनिधींकडे जातात. या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव आणि विसंवाद वाढतो. त्यातूनच जनतेची अनेक कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे अधिकारी
‘केशायुर्वेद’तर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवाद पुणे : भारतातील पहिले आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेद आणि बीव्हीजी इंडियातर्फे आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या
‘सायलीची वाटचाल थक्क करणारी’ पुणे : ‘डाउन सिंड्रोमवर मात करून, नृत्यासारखी कठीण कला आत्मसात करून आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करणारी, सायली नुसतीच ‘अमेझिंग चाइल्ड’ नाही, तर ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग चाइल्ड’ आहे. तिच्या प्रतिभेने मी थक्क झालो आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सायली अगावणे हिचे कौतुक केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language