विचारवंत लेखक पु. ग. सहस्रबुद्धे यांचा दहा जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... ....
दहा जून १९०४ रोजी जन्मलेले पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे हे विचारवंत निबंधकार म्हणून ओळखले जातात. १९३९ साली ‘स्वभाव लेखन’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. माझे चिंतन, विज्ञानप्रणित समाजरचना, भारतीय लोकसत्ता, लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान, राष्ट्रधर्म, हिंदू समाज, महाराष्ट्र संस्कृती, इहवादी शासन, केसरची त्रिमूर्ती, साहित्यातील जीवनभाष्य, लपलेले खडक, वाढू संशोधन, सत्याचे वाली, सौंदर्यरस, पराधीन सरस्वती, राजविद्या, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
चार मार्च १९८५ रोजी त्यांचं निधन झालं.