Ad will apear here
Next
काय खाऊ, किती खाऊ?
काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. पोषणमूल्य असलेले पदार्थ खाणे नेहमीच हितकारक ठरते. आजारपणातही आहाराला महत्त्व असते. शिवाय आजाराच्या स्वरूपानुसार आहारही बदलत असतो. कोणत्या वेळी कोणता आहार घ्यावा यावर डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’मधून मार्गदर्शन केले आहे.

परीक्षार्थींनी काय खावे, काय टाळावे, उन्हाळ्यातील आहार आणि कोकणी मेवा, स्थूल व्यक्तींचा आहार, फॅड डाएटचे खूळ व त्याचे प्रकार यात दिले आहेत. प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुण असतो. हे लक्षात घेऊन भात, बटाटा चीज यांसारखे पदार्थही खावेत; पण असे पदार्थ प्रमाणात खावेत, असा सल्ला लेखिका देते.    

प्रथिनयुक्त डाळी व कडधान्ये, जीवनसत्त्वे व खनिजे यांचे आहारातील महत्त्वही समजावून दिले आहे. शाळकरी मुले, पौगंडावस्थेतील मुले, गर्भवती, स्तनदा माता, बाळांचा आहार, ज्येष्ठ व्यक्ती यांचा आहार काय असावा तसेच थंडी, पावसाळ्यात काय खावे हे यातून सांगितले आहे.

पुस्तक : काय खाऊ, किती खाऊ?
लेखक : वैशाली जोशी
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स
पाने : २२३
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTYBW
Similar Posts
खा; पण प्रमाणात... कोणत्या वेळी, कोणत्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’ हे पुस्तक लिहिले आहे. परीक्षार्थींनी काय खावे, काय टाळावे, उन्हाळ्यातील आहार आणि कोकणी मेवा, डाएटचे खूळ आदी गोष्टींवर यात भाष्य केले आहे. प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुण असतो
औषधभान ‘ग्राहकांमध्ये औषधांबाबतची जागरुकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे आवश्यक आहे. औषध तेच, पण योग्य मात्रेत जबाबदारीने वापरले, तर अमृत, नाहीतर होते एक विष’, असे प्रा. मंजिरी घरात यांनी म्हटले आहे. जबाबदारीने वापरणे म्हणजे औषधसाक्षरता. या पुस्तकात त्यांनी वाचकांना औषधसाक्षर केले आहे.
मेनोपॉज मेनोपॉजचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होत असतात, तसेच तिच्या भावविश्वात. या काळाला सहजतेने सामोरे जाण्यासाठी काय करावे, याचे शास्त्रीय मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी या पुस्तकातून केले आहे.
वास्तुसुखाची अकरावी दिशा वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे स्वरूप मुकुंद काणे यांनी या पुस्तकातून स्पष्ट केले आहे. आधुनिक जीवनशैली आणि वास्तुशास्त्र यांची सांगड त्यांनी घातली आहे. वास्तुरचनेसंबंधातील काही उपाय अवलंबले, तर अनेक रोगांवरही मात करता येते, असा दावा ते करतात. घरात शांतता कशी नांदेल, सुखाची झोप घेण्यासाठी काय करता येईल आदींसाठी वास्तुशास्त्राचा वापर करता येतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language