काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. पोषणमूल्य असलेले पदार्थ खाणे नेहमीच हितकारक ठरते. आजारपणातही आहाराला महत्त्व असते. शिवाय आजाराच्या स्वरूपानुसार आहारही बदलत असतो. कोणत्या वेळी कोणता आहार घ्यावा यावर डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’मधून मार्गदर्शन केले आहे.
परीक्षार्थींनी काय खावे, काय टाळावे, उन्हाळ्यातील आहार आणि कोकणी मेवा, स्थूल व्यक्तींचा आहार, फॅड डाएटचे खूळ व त्याचे प्रकार यात दिले आहेत. प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुण असतो. हे लक्षात घेऊन भात, बटाटा चीज यांसारखे पदार्थही खावेत; पण असे पदार्थ प्रमाणात खावेत, असा सल्ला लेखिका देते.
प्रथिनयुक्त डाळी व कडधान्ये, जीवनसत्त्वे व खनिजे यांचे आहारातील महत्त्वही समजावून दिले आहे. शाळकरी मुले, पौगंडावस्थेतील मुले, गर्भवती, स्तनदा माता, बाळांचा आहार, ज्येष्ठ व्यक्ती यांचा आहार काय असावा तसेच थंडी, पावसाळ्यात काय खावे हे यातून सांगितले आहे.
पुस्तक : काय खाऊ, किती खाऊ?
लेखक : वैशाली जोशी
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स
पाने : २२३
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)