डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या जोखडातून मुक्त केलेला उपेक्षित समाज आज सन्मानाने जगतो आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात तो प्रगती करीत आहे. आर. के. जुमळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची कास धरली आणि खेड्यातील आयुष्य झिडकारून टाकले. हा सर्व प्रवास म्हणजे बाबासाहेबांचे ऋण आहे., असे मानीत त्यांनी ‘अशा तुडविल्या काटेरी वाटा’मधून अनुभव कथन केले आहे.
चौधरा गावात लेखकाचे बालपण गेले. दोन डोंगरांमध्ये वसलेल्या गावाचे सौंदर्य कथन करतानाच कुठलीही सोई-सुविधा नसलेल्या गावाच्या झालेल्या दुर्दशेचे वर्णनही यात आहे. जातीभेदाने दुभंगलेल्या गावातील समाज, चालीरीती, आई-वडील व भावंडांच्या आपुलकीचे घर, अशिक्षित आईची जागरूकता, घरातील हरहुन्नरी कलाकार, जातीभेदाने उद्ध्वस्त झालेली घरे, शिक्षांची ओढ, राजकारणामुळे भावाचे झालेले नुकसान, महाविद्यालयीन जीवन हे यातून उलगडले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिकपदी नोकरी मिळेपर्यंतच्या आठवणी यात लेखकाने सांगितल्या आहेत.
पुस्तक : अशा तुडविल्या काटेरी वाटा
लेखक : आर. के. जुमळे
प्रकाशक : स्वयंदीप प्रकाशन
पाने : २९४
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)