Ad will apear here
Next
गोष्ट छोटी डोंगराएवढी!
गावाचे चित्र म्हटले की एक घर, जवळून वाहणारी नदी, पाठीमागे डोंगर, आकाशात उडणारे पक्षी हटकून दिसत असे; पण गावचे शहरीकरण होऊ लागले, ग्रामविकासाच्या नावाखाली ग्रामसंस्कृतीचा विसर पडला अन गावचे गावपण हरवले. अशा गावांच्या, गावकऱ्यांच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी हो‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’मधून सांगितल्या आहेत. 

कोळेवाडीतील जनार्दन हा नाचकाम करणाऱ्या रेखाचा मुलगा. सैन्यात असताना दहशतवाद्यांचा खात्मा करताना तो धारातीर्थी पडतो. त्याची जात माहित नसल्याने कोणत्या जातीच्या स्मशानात त्याच्यावर अंतिमसंस्कार करायचे, हा प्रश्न ‘अमर राहे!पण कुठे’ या कथेतील गावकऱ्यांना पडतो. ‘सोनामावाशी’चे लग्न झाल्यावर पाऊस पडल्याने तिला बायका देवी मानायच्या. पतीच्या मागे तिने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले; पण मुले मात्र नोकरीनिमित्त शहरात गेल्यानंतर आईला विसरले. गावातील राजकारणाचा बळीचा बकरा ठरलेला शंकर घाडगे, आमदारांचा राइट हँड असलेल्या दीप्याचे भवितव्य, स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या विन्याने मैत्रिणीला सन्मार्गावर आणण्यासाठी लढविलेली ‘स्मार्ट’ शक्कल, अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.

पुस्तक : गोष्ट छोटी डोंगराएवढी
लेखक : अरविंद जगताप
प्रकाशक : इंडियन भारत पब्लिकेशन्स 
पाने : १८० 
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKLCC
Similar Posts
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेचे अभिवाचन : ‘ऐक.. टोले पडताहेत’ ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या गूढकथा हा कायमच रसिकांच्या आवडीचा विषय होता.. ‘ऐक.. टोले पडताहेत’ या त्यांच्या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाच्या कथेच्या, तनुजा रहाणे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेअर करत आहोत... ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातून..
छत्रपती शिवाजी अँड सुराज्य ‘छत्रपती शिवाजी अँड सुराज्य’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
महाभारताचा उपसंहार (पूर्वार्ध) पुण्यातील ‘चिपळूणकर आणि मंडळी’ या प्रकाशन संस्थेने ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ नऊ भागांत प्रसिद्ध केले. त्याचा सर्वांगीण परामर्श घेणारा विवेचक उपसंहार सिद्ध करण्याचे संशोधनपर काम रा. ब. चिंतामणराव विनायक वैद्य यांनी स्वीकारले आणि चार वर्षांत समर्थपणे पार पाडले. ‘उपसंहार’ या हजार पानी ग्रंथाची पहिली आवृत्ती सन १९१८मध्ये प्रसिद्ध झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language