Ad will apear here
Next
‘संस्कृत भाषेला मरण नाही’
मुंबई : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतर कोणत्याही भाषेपेक्षा सर्वाधिक म्हणजेच एकूण ३०० महाकाव्यांचे लेखन संस्कृतमध्येच झाले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी संस्कृत भाषा ही संगणकीय भाषा म्हणून मान्यता पावलेली आहे. अशा भाषेला मरण असणे अशक्य आहे,’ असे प्रतिपादन अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे प्रख्यात कवी अभिराज राजेंद्र मिश्रा यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे पाच मार्च रोजी मुंबई विद्यापीठातील संस्कृत भवनात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अभिराज राजेंद्र मिश्रा यांनी संस्कृतसह तीन भाषांमध्ये साहित्यलेखन केले आहे. त्यात कथा, कविता, गझल इत्यादींचा समावेश आहे. संस्कृतमध्ये ‘भग्न पंजर’ या नावाची त्यांची एक लघुकथा आहे. त्यात त्यांनी एका असहाय मुलीची व्यथा मांडली आहे. पहिली संस्कृत गझल लिहिण्याचा प्रयोगदेखील मिश्रा यांनीच केला. ‘मत्तवारिणि’ असे त्यांच्या गझलसंग्रहाचे नाव आहे. प्रेयसीविषयी अथवा प्रियेशी बोलणे या अर्थाचा गझल हा एक अरेबिक शब्द आहे. राजेंद्र मिश्रा यांनी यात गझल या प्रकारचे नियम सांभाळून रचना केल्या आहेत.

त्यांनी ‘अभिराज यशोभूषणं’ या काव्यप्रकाराची निर्मिती करत असताना ३८ नवीन छंदांची निर्मिती केली आहे. इतर अनेक भाषापेक्षा संस्कृत ही भाषा विविध विशेषणांनी परिपूर्ण आहे हे सांगताना त्यांनी भुंग्याची भ्रमर, रोदर, मधुकर ही नावे सांगितली आणि शब्दांचे सौंदर्य उलगडून दाखवले. 

संस्कृत भाषा ही सर्व भाषांचे मूळ आहे. जसा काळ बदलतो तसे भाषेतदेखील परिवर्तन घडून येते व त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिराज राजेंद्र मिश्रा यांचे साहित्य. संस्कृत भाषा ही फक्त देववाणी नसून, ती सर्वसामान्यांची भाषा आहे याची अनुभूती येते. 



अभिराज मिश्रा यांनी तरुणांनाही लाजवेल अशा आपल्या खड्या, पण सुमधुर आवाजात व एक कविता सादर केली. त्या कवितेचे शीर्षक ‘न मृता म्रियते न मरिष्यति वा’ असे आहे. या कवितेत संस्कृत भाषेचे गुणगान आहे. 

अमृतादधिकं परिपोषकरी
सुकृतादधिकं भवदोषहरी
पदबन्धरसामृतचारुचयै:
चितिनीरसतां रसयिष्यति वा। 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एका प्रथितयश साहित्यिकाला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. कवींची ओळख डॉ. माधवी नरसाळे यांनी करून दिली आणि आभारप्रदर्शन संस्कृत विभागप्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZTYBY
 It seems likely to servive the way Latin does -- as base .
 It would be easy to learn if grammar is is used for the purpose of
reference only , like a dictionary . Nobody reads it , nobody
studies it . Yet everybody knows its importance .



studies it . Yet everybody agrees that it is important
Similar Posts
मुंबई विद्यापीठात संस्कृत कवींचे सादरीकरण मुंबई : ‘लेखक आमच्या भेटीला’ अर्थात ‘लेखक: मिलति अस्मान्।’ या उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील संस्कृत विभागात दोन मार्च रोजी डॉ. हर्षदेव माधव व डॉ. ऋषिराज जानी या पिता-पुत्रांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या काव्यसादरीकरणाने त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
हस्तलिखित शास्त्रावरील चर्चासत्राचे मुंबई विद्यापीठात आयोजन मुंबई : ‘हस्तलिखित शास्त्र : आयाम आणि दिशा’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात १८ व १९ फेब्रुवारी रोजी पार पडले. विभागप्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी विभागाचे अहवालवाचन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
रत्नागिरीची स्वरदा महाबळ संस्कृत सुवर्णपदकाची मानकरी रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची स्वरदा उदय महाबळ ही विद्यार्थिनी २०१८-१९च्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आली आहे. त्यामुळे तिला मुंबई विद्यापीठाचे संस्कृत विषयासाठी असलेले लक्ष्मीबाई द्वारकानाथ नाईक सुवर्णपदक मिळाले आहे. मुंबई विद्यापीठात अलीकडेच झालेल्या
रेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू नाशिक : गीर्वाणवाणी अर्थात देवभाषा संस्कृत शिकण्यात रस घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे. श्रवण हा भाषाशिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन १६ ऑगस्ट २०१९ रोजी ‘रेडिओ संस्कृत भारती’ या जगातील पहिल्या संस्कृत इंटरनेट रेडिओचे मोफत प्रसारण सुरू करण्यात आले आहे. विविध भाषांचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language