Ad will apear here
Next
निवडक डेल कार्नेगी
मोठ्या जमावापुढे भाषण देणे यासाठी संभाषण कौशल्याची गरज असते. हा गुण प्रत्येकाकडे असतो, फक्त त्याला बाहेर काढावे लागते. हे कसे साध्य करायचे हे डेल कार्नेगी यांनी ‘निवडक डेल कार्नेगी’तून सांगितले आहे.

अमेरिकन लेखक व वक्ते असलेल्या डेल कार्नेगी यांची ‘प्रभावी वक्तृत्वासाठी झटपट आणि सोपे उपाय’, ‘मित्र कसे बनवावेत? लोकांमध्ये प्रभाव कसा निर्माण करावा?’ आणि ‘चिंतामुक्त होऊन जीवन कसं जगावं?’ या तीन बेस्ट सेलर पुस्तकातील वेचक ज्ञान डॉ. श्रुती पानसे यांनी मराठीतून वाचकांसाठी खुले केले आहे.

पहिल्या भागात जगात यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्याकडे कोणते गुण हवेत व त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले आहे. ‘मित्र कसे बनवावेत’ यात लोकांना हाताळण्याची मुलभूत तंत्र, चांगला संवाद साधण्याची कला आदी अनेक मुद्दे विस्तृतपणे स्पष्ट केले आहेत. चिंतामुक्त जगण्यासाठी चिंतादायक समस्यांचे विश्लेषण व त्या सोडविण्याचा प्रयत्न अशा अनेक प्रकरणांमधून विविध तंत्र समजावून दिले आहे.

पुस्तक : निवडक डेल कार्नेगी
लेखक : डेल कार्नेजी
अनुवादक : श्रुती पानसे
प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : ३१४
किंमत : २९० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZZNBW
Similar Posts
जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे ‘ऐकावे जनाचे, पण करावे मनाचे’ ही म्हण बहुतेकांना परिचित असते. आपल्या सुप्त मनाची इच्छा ओळखल्यास हे शक्य होते. यासाठी ‘मज्जाभाषिक आज्ञा प्रणाली’ची (न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग- एनएलपी) पद्धती उपयोगी पडते, असा दावा ग्रुप कॅप्टन दी. प्र. आपटे (निवृत्त) यांनी केला असून, ‘जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे’ या पुस्तकातून त्याची माहिती दिली आहे
या कातरवेळी जन्म मृत्यूदरम्यानच्या जीवनातील सर्व अवस्थांपैकी वृद्धत्व ही काहीशी घाबरवून सोडणारी अवस्था असते; मात्र ती जीवनाची परीपूर्णताही असते, हे लक्षात घेऊन या अवस्थेला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकानेच मिळवायला हवी.
हॅलो मी प्रतिमानव शाळा-महाविद्यालयीन पुस्तकांमधील विज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनचाच भाग असते. सध्याच्या यांत्रिक युगात तर विज्ञानशिवाय पान हालत नाही. यंत्रमानवासारख्या संकल्पना काही वर्षांपूर्वी काल्पनिक वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात आल्या आहेत. यातूनच शरद पुराणिक यांनी विज्ञानरंजक कथा ‘हॅलो मी प्रतिमानव’मध्ये लिहिल्या आहेत
आनंदवनाचा विकास कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला. या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’मधून कथन केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language