Ad will apear here
Next
अष्टावक्र-नाथगीता
गीता म्हटले, की महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली अध्यात्म दर्शन घडविणारी गीता आठवते. अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी श्रीकृष्णाने युद्धभूमीवर त्याला केलेला उपदेश म्हणजे गीता; पण अष्टावक्र मुनींनी सांगितलेली गीता ही त्यापेक्षा वेगळी आहे. यात आत्मज्ञानी अष्टावक्र मुनी आणि राजा जनक यांच्यातील संवाद आहे. पूर्ण वैराग्य आणि आत्मज्ञान कसे प्राप्त होईल, यासाठी अष्टावक्र मुनींनी ही गीता सांगितली आहे. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधकाने काय केले पाहिजे, हे यात सांगितले आहे. या गीतेचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘अष्टावक्र-नाथगीता’ या पुस्तकातून केले आहे. आठ मितींनी विस्तारत जाणाऱ्या आत्म्याच्या जाणिवेचा प्रवास यातून दिसतो. सततच्या ध्यासाने आणि तळमळीने तो जाणून घेताना सूक्ष्म आणि एकाग्र मनाने भौतिकापलीकडील ज्ञान कसे आत्मसात करावे, याचे मार्गदर्शन या ग्रंथात अत्यंत सोप्या व सरळ भाषेत केले आहे. आत्मचिंतनातून ज्ञान, भक्ती आणि वैराग्यप्राप्तीद्वारे आत्मबोधाचा मार्ग या ग्रंथाच्या आधारे वाचकांना सहज समजेल.

पुस्तक : अष्टावक्र-नाथगीता
लेखिका : डॉ. वृषाली पटवर्धन
प्रकाशन : आरंभ प्रकाशन
पृष्ठे : ३२१
मूल्य : ३०० रुपये

(‘अष्टावक्र-नाथगीता’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZDCD
Similar Posts
नाथगीता (अध्याय १ ते १८) श्रीमद्भगवद्गीता हा भारतीयांचा महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. तिच्या वाचनातून अंतिम सत्याचे दर्शन घडण्यास मदत होते. व्यवहार व परमार्थ एकत्र साधला जातो. यामुळे आध्यात्मिक गोंधळ बाजूला सारता येतो आदी मुद्दे स्पष्ट करीत त्यांचे विवेचन व गीतेचे हे वेगळेपण डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथगीता’मधून दाखवून दिले आहे
नाथ भागवत महाभारत आणि श्रीमद्भागवत या दोन्हींचे रचनाकार व्यास मुनी आहेत. महाभारतात युद्धाचे, भागवतात भक्ती आणि शांत रसाचे वर्णन आहे. यातील कथेत माणूस रमतो, पण चमत्कारात न गुंतता त्याचे सार काय आहे समजून घेणे आवश्यक आहे, असा विचार मांडत डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथ-भागवत’मधून त्यातील सारसंग्रह वाचकांपुढे ठेवला आहे
नाथ- अष्टांगयोग पातंजल योगसूत्र म्हणजेच अष्टांग योग. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही महत्त्वाची आठ अंग आहेत. त्यांची सत्य, अहिंसा, अस्तेय अशी बरीच उपांग आहेत. या सर्वांचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथ- अष्टांगयोग’मधून केले आहे.
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language