Ad will apear here
Next
कलायडोस्कोप
व्यावसायिक कामासाठी जगभर फिरताना विविध अनुभव डॉ. प्रसाद मोडक यांना आले. वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्ती भेटल्या, या अनुभवावर त्यांनी ब्लॉगवर लेखन केले. यातील ४० लेखांचा संग्रह त्यांनी ‘कलायडोस्कोप’मधून वाचकांपुढे सादर केला आहे.

‘स्मार्टफोनशिवाय जगता येईल का?’ याचे उत्तर त्यांनी इंद्राच्या दरबारात भरलेल्या देवसभेतील प्रसंगातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोन बंद असल्यास यात पृथ्वीवरील दिग्गजांच्या आयुष्यात काय घडेल याचे मिश्कील वर्णन केले आहे.

वर्कशॉपनिमित्त बांगलादेशला गेल्यावर राष्ट्रगीत गायनातून दिसलेली देशप्रेमाची भावना, विमानप्रवासात अगदी प्रवासी कोणत्या जागेवर बसतात, त्यावरून त्यांची केलेली पारख, व्हिव्हियन रिचर्ड्स, अमिताभ बच्चन, रतन टाटा या दिग्गजांबरोबर प्रवासातील अनुभव, ३० मिनिटांनी मरण येणार असल्याचे समजल्यावर आठवलेले ब्रह्मांड, हाँगकाँगमध्ये भेटलेली बाइक या मैत्रिणीच्या आठवणी, असे सारे काही यातील लेखांमध्ये आहे. याचा मराठी अनुवाद ललिता मोदक यांनी केला आहे.       

पुस्तक : कलायडोस्कोप
लेखक : प्रसाद मोडक
अनुवादक : ललिता वैद्य
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन
पाने : २३८
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZIHBW
Similar Posts
पंख कथा या प्रामुख्याने कौटुंबिक चौकटीत लिहिलेल्या असतात; परंतु उर्मिला सिरूर यांच्या कथांमधून व्यापक विषय येतात. याची प्रचिती ‘पंख’ या कथासंग्रहातून येते. स्त्रीच्या बदलत्या जाणिवा, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचे समाधान हे या कथांमधून उमटते.
‘पानगळ’ : मनाला चक्रावून टाकणारं अद्भुत कोडं हृषीकेश गुप्ते या लेखकाच्या लांब पल्ल्याच्या गूढ कथा कायमच व्यक्ती आणि त्यांच्या भावनावलयांना शब्दबद्ध करू पाहतात. आदिम जाणिवा, मूलभूत गरजा-भावना, डोकं चक्रावून टाकणारी कोडंसदृश मांडणी आणि ठराविक टप्प्यांवर वाचकाला बसणारे जबरदस्त धक्के या सर्वांतून जन्म घेणाऱ्या या कथा असतात. याच प्रकारच्या घटक तत्त्वांचा
खा; पण प्रमाणात... कोणत्या वेळी, कोणत्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’ हे पुस्तक लिहिले आहे. परीक्षार्थींनी काय खावे, काय टाळावे, उन्हाळ्यातील आहार आणि कोकणी मेवा, डाएटचे खूळ आदी गोष्टींवर यात भाष्य केले आहे. प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुण असतो
मसूरची संज्योत ‘सामन्यात’ ‘असामान्यत्व’ आढळणारे व्यक्तिमत्त्व असलेले र. वि. उर्फ राघूअण्णा लिमये म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांची कन्या आशा लिमये यांनी ‘मसूरची संज्योत’मधून अण्णांचे जीवनचित्रण केले आहे. लिमये यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा होता. म्हणूनच लेखिकेने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language