शाहरुख खानचा ‘...नाम तो सुना होगा’ हा संवाद अत्यंत लोकप्रिय झाला होता. शाहरुखप्रमाणेच आयुष्यात यश मिळवायचे असा निश्चय सागर रेड्डी करतो; पण ही वाट खडतर होती. याचे कारण सागरला घर नव्हते. तो अनाथ होता. लोणावळ्यातील बालग्राममध्ये त्याचे बालपण गेले. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी तो मुंबईत दाखल होतो. तेथे खऱ्या अर्थाने जीवनाची परीक्षा सुरू होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे परवडत नसल्याने दाता शोधावा लागतो. मिळेल ते काम करून सागर शिक्षण पूर्ण करतो. बड्या कंपनीत नोकरी मिळाल्यावर त्याला कोऋहम् हा प्रश्न पडला. तेव्हा त्याला डोळ्यांसमोर त्याच्या अनाथ बांधवांचे चेहरे दिसायला लागतात आणि जीवनाचे इप्सित गवसते. स्वतः अनाथ असूनही त्याने अनेकांचे पालकत्व प्रेमाने स्वीकारले. त्यासाठी अनेक सुवर्णसंधींवर त्याने पाणी सोडले. अलौकिक उंचीवर गेलेल्या सागरची ही खरीखुरी, प्रेरणादायी कहाणी सुनीता तांबे यांनी ‘सागर रेड्डी... नाम तो सुना होगा’ या पुस्तकातून कथन केली आहे.
पुस्तक : ‘सागर रेड्डी... नाम तो सुना होगा
लेखक : सुनीता तांबे
प्रकाशक : अक्षयभारती प्रकाशन
पृष्ठे : १५२
मूल्य : २०० रुपये
(‘सागर रेड्डी... नाम तो सुना होगा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)