Ad will apear here
Next
नामदेव ढसाळ, शांता निसळ
‘बदनशिबाचा पाऊस, त्यात चौमुलखी वादळे, अवघ्या हिरव्या रानात-कुणी उगाच उभा जळे’ म्हणणारे कवी नामदेव ढसाळ आणि ज्येष्ठ संगीत समीक्षिका आणि लेखिका शांता निसळ यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
नामदेव लक्ष्मण ढसाळ 

१५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्यात जन्मलेले नामदेव लक्ष्मण ढसाळ हे कवी, लेखक, कादंबरीकार आणि नाटककार अशा विविध पैलूंनी प्रसिद्ध असणारे दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते. मुंबईतल्या अत्यंत गरीब आणि बकाल भागात बालपण घालवल्याने त्यांनी दारिद्र्य आणि ससेहोलपट जवळून पाहिली आणि आपल्या विशिष्ट भाषेतून त्यांनी ते दलितांचं आयुष्य शब्दबद्ध केलं.  

एकीकडे ‘दलित पँथर’सारख्या उग्रवादी चळवळीतून जहाल आंदोलनं करत त्यांनी विद्रोही कविता आणि लेख लिहिणं चालू ठेवलं होतं.

चिंध्यांची देवी आणि इतर कविता, गोलपिठा, हाडकी हाडवळा, गांडू बगीचा, खेळ, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे!, निर्वाणा अगोदरची पीडा, सर्व काही समष्टीसाठी, या सत्तेत जीव रमत नाही, तुझे बोट धरुनी चाललो आहे मी, आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट, तुही यत्ता कंची? तुही यत्ता..., दलित पँथर एक संघर्ष, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१५ जानेवारी २९०१४ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. 

(नामदेव ढसाळ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...............

शांता हरी निसळ

१५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुण्यात जन्मलेल्या शांता निसळ या ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. 

महिलांच्या विजिगिषु वृत्तीवर त्यांनी कथालेखन केलं आहे. त्यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर ‘उंबरठा’ हा प्रसिद्ध सिनेमा बनला आणि गाजला.

धडपड्या आणि बंडखोर स्वभावाच्या शांता यांनी आपले वडील व्यंकटेश जोशी यांच्या पाठिंब्यामुळेच स्वतःला घडवलं अशी आठवण सांगितली आहे. विद्यार्थिदशेत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही भाग घेतला होता. 

आहुती व एकलव्य, उंबरठा, मृत्यू माघारी गेला, विमुक्ता, विसंवाद – अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

सात मे २०१३ रोजी त्यांचं निधन झालं.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTPCJ
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language